Summary of the Book
गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्नी म्हणजे यशोदा आगरकर यांचे चरित्र वैजयंती काळे यांनी 'माळावरची मानिनी' या कादंबरीतून साकारले आहे. विवाह होऊन सात वर्षांची अंबू फडके ही यशोदा गोपाळ आगरकर होते. आपल्या पत्नीने चूल अन मूल यातच अडकून न राहता लिहायला, वाचायला शिकावे, घराबाहेर पडून जगात काय चालले आहे, हे जाणून घ्यावे, असे गोपाळरावांना वाटत असते. आगरकर दमेकरी असल्याने आपल्या मृत्युनंतर यशोदेने इतर विधवा स्त्रियांसारखे न राहता आपल्या पायावर उभे राहण्याचा सल्ला ते देत असत
दुर्दैवाने तसा प्रसंग त्यांच्या आयुष्यात येतो. त्या वेळची केशवपनाची परंपरा त्या मोडतात व सकेशा राहतात. यातून अनेकांचा रोष त्या ओढवून घेतात. सख्या दिरांकडून फसवणूक होते. भाऊ-वाहिनी दुरावतात; पण यशोदाबाई खचत नाही. पतीला दिलेला शब्द पाळण्याच्या निश्चयाने सुईणीचे काम करून तीन मुळे व आपला उदरनिर्वाह करतात.
या कादंबरीतून यशोदाबाईंचे व्यक्तीमत्त्व प्रभावीपणे मांडले आहेच, शिवाय समाजसुधारणेचा ध्यास घेतलेल्या आगरकर यांना कसा त्रास देण्यात आला, टिळक व आगरकर यांच्यातील मतभेद हेही समोर येते.