Summary of the Book
कोकणातील एक मुलगा राजस्थानमध्ये निःशुल्क शिक्षण मिळते म्हणून मॅट्रिक नंतर शिकायला तिकडे जातो. वामन वासुदेव चितळे उर्फ अप्पासाहेब चितळे यांनी हे धाडस केले. बी. ए. झाल्यावर त्यांनी वकिलाची परीक्षा दिली. ज्युनिअर म्हणून काम करताना ते खटल्यांचे संदर्भ काढून देत असत. अनेक मोठ्या वकिलांना संदर्भ लागतात, हि गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी १९२२ मध्ये अखिल भारतीय स्तरावरील 'ऑल इंडिया रिपोर्टर' हे मासिक काढले. त्यात भारतातील उच्च न्यायालयांचे, तसेच प्रीव्ही कौन्सिलचे निवाडे असत. त्यांचे हे कार्य त्या वेळी देशातील बहुतेक सर्व वकिलांना उपयुक्त होते. त्यांच्या कामाचे महत्व जयंत चितळेलिखित 'विधीज्ञ'मधून समजते. वडिलांचे चरित्र लिहिताना त्यांनी गुणांबरोबरही दोषांचाही उल्लेख केला आहे. म्हणूनच यातून चितळे यांचे खरे व्यक्तिमत्व उभे राहिले आहे. हे चरित्र रंजक व उद्बोधक व काहीतरी करून दाखविण्याची हिंमत बाळगणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.