Summary of the Book
बालमानसशास्त्र समजावून घेऊन पालकांना मार्गदर्शन करणारं हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. लेखिका डॉ. अंजली जोशी यांनी प्रारंभीच विवेकी पालकत्वाची संकल्पना उलगडून सांगितली आहे. पालकांना मुलांकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षांविषयी त्या लिहितात. मुलांना पराजयाशी सामना करायला, वैफल्य पचवायला कसं शिकवायचा, मुलाचा राग कसा शांत करायचा, न्यूनगंडापासून सुटका कशी करायची, मुल एकुलतं एक असेल तर कसं वागायचं, मुलांवरची शिक्केबाजी कशी थांबवायची आदींचं मार्गदर्शन त्या करतात. त्याचवेळी मात्या-पित्यामधील मतभेद मिटवणं आवश्यक असल्याचं त्या सांगून विवेकी दृष्टीकोनासाठी अभिनव प्रयोग करण्याची दिशा त्या दाखवितात. आपण कोणत्या प्रक्रारचे पालक आहोत हे ओळखण्याचं कौशल्य त्या शिकवतात. विवेकी पालकत्वाचे २६ मंत्रही जरूर वाचण्याजोगे.