Summary of the Book
सगळ्यांना वाटतं कविता म्हणजे, मी आरास मांडतो शंकांची, ठाऊक नसते कोणालाही ती, तर व्यथा एकेक जखमांची या "जखम‘ कवितेतील ओळी. सांगलीतील कवी तुषार कुलकर्णी यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहातील अशा ओळी कवीची ताकद दाखवून देतात. संग्रहातील विविध कवितांमधून निसर्ग आणि मानवी नात्याचा वेध घेण्यात आला आहे. कवी संवेदनशीलतेनं विविध विषय यात मांडतो, त्याला चिंतनाचीही जोड आहे. आईबद्दलही कवी विशेष हळवेपणानं लिहितो. प्रेमाची असोशी आणि विरहवेदनाही काही कवितेत व्यक्त झालेल्या आहेत. ज्येष्ठ कवी डॉ. शंतनू चिंधडे यांची प्रस्तावना आहे.