Summary of the Book
पारतंत्र्यात इंग्रजी सत्तेविरुद्ध दोन हात करण्यासाठी सातारा-सांगलीहून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतीसरकार स्थापन केले. यालाच पत्री सरकार असेही म्हणतात. या माध्यमातून क्रांतीसिहांनी ग्रामराज्याचा आदर्श प्रयोग राबविला. भारतीय लोकशाहीतील सत्तेच्या विकेंद्रीकरणात ही रचना महत्वाची ठरली आहे. १९४२ च्या काळात त्यांनी जो लढा उभारला, त्याने इंग्रज सरकाच्या नाकी नाऊ आले होते. भूमिगत चळवळीतून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. क्रांतिसिंहांचे चरित्र, व्यक्तिमत्व, त्यांची चळवळ याचे चित्रण प्राचार्य व. न. इंगळे यांनी पत्री सरकार मधून रेखाटले आहे.