Summary of the Book
गेल्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिक क्रांती झाली. माणसाची जीवनशैली, विचार, मूल्यं यात प्रचंड उलथापालथ झाली. ती विचारवंत, प्रतिभावंत, कलावंत यांच्या चिंतनाचा विषय ठरली. शतक सरता सरता अशीच एक प्रचंड उलथापालथ झाली. माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट. तिनं माणसाच्या माणूसपणाचाच घास घेण्याची प्रक्रिया जन्माला घातली. प्रचंड वेगवान स्पर्धेत तगून राहण्याचा ताण डोक्यावर घेऊन धावणा-या एका एकाकी असुरक्षित माणसाचं हे जीवननाट्य.