Summary of the Book
संजय सोनवणी यांनी या पुस्तकात इतिहासातील एका वेगळ्याच कालखंडावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मल्हाराव होळकर यांच्यानंतर संपूर्ण भारतात आपल्या तलवारीचा धाक निर्माण करणारा हा रणधुरंधर सेनानी.
शिवाजीमहाराजांच्यानंतर राज्याभिषेक करवून घेणाऱ्या या राजाने इंग्रजांचा धोका सर्वप्रथम ओळखला होता. 1803 पासून त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध व्यापक लढा उभारून जास्तीत जास्त जणांना त्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला होती. पुणे लुटल्याचा काही इतिहासकारांनी त्याच्यावर केलेला आरोप किती अन्यायकारक आहे आणि चुकीचा व खोटा कसा आहे हे या पुस्तकात सोनवणी यांनी पटवून दिले आहे.