Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
देशाच्या अर्थव्यवस्थेवर शास्वत वृद्धी व विकास होण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक असते . या पार्श्वभूमीवर विविध कृषी व इतर उद्योग क्षेत्रातील संधीचा फायदा घेण्यासठी तरुणाईला अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलते तंत्रज्ञान आणि कौशल्य प्रशिक्षण देऊन उत्पादनक्षम बनविणे आवश्यक असते . त्यानुसार भारत सरकारने ' राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम ' सुरु करून ' कौशल्य भारत ' ( Skill India ) या महत्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात केली . याच धर्तीवर महाराष्ट्रातही ' मेक इन महाराष्ट्र ' या औद्योगिक विकासाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली असून रोजगाराभिमुख प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे सर्वोच्च ध्येय ठरवण्यात आले . कामाला सुरुवातही झाली . या महत्वाकांक्षी योजनेला आणि पर्यायाने युवावर्गाला सक्षम करण्यासाठी मराठवाडा विभागही मागे राहिला नाही . औरंगाबाद विभागात ' एकच लक्ष - दशलक्ष स्वयंरोजगार निर्मिती उपक्रम ' या महत्वाकांक्षी प्रकल्पाला धडाक्याने सुरुवात झाली आणि पाहता पाहता या उपक्रमाने बाळसे धरले . या उपक्रमाला सर्वस्तरावर यशस्वी करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ . पुरुषोत्तम भापकर यांच्यासारख्या धडकेदार अधिकारी मिळणं ही जमेची बाजू असून त्यांनी ज्या पद्धतीने अथक परिश्रम घेतले ते वाखाणण्याजोगे आहेत . मराठवाड्यासारख्या मागास समजल्या जणाऱ्या विभागात ' युवकांनो , स्वावलंबी व्हा ! ' अशी हाक देत डॉ . भापकर यांनी ज्या तळमळीने काम केले आहे , त्याचा सुपरिणाम आज मराठवाड्यातल्या तरुणवर्गाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे . कौशल्य विकासाची देश - राज्य स्तरावरील स्थिती , त्याबाबतची ध्येयधोरणे , कौशल्य विकासासंबंधी मराठवाड्यात असणाऱ्या संधी व भविष्यातील फलनिष्पत्ती या सर्वांचा सविस्तर उहापोह आकडेवारीसह या पुस्तकात करण्यात आला आहे . हे पुस्तक वाचताना मराठवाड्याकडे पाहण्याची नकारात्मक दृष्टी बदलवण्यात विभागीय आयुक्त यशस्वी झाले आहेत .