Summary of the Book
महाराष्ट्रात अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यातील एक कीर्तन आहे. भारतीय कीर्तनाचा उल्लेख पाचव्या शतकात सापडतो. भागवत ग्रंथात कीर्तनाचे विवेचन केले आहे. महाराष्ट्रात नारदीय व वारकरी कीर्तनाचा प्रसार अधिक झाला. यात वक्तृत्व, संगीत, अभिनय, तत्त्वज्ञान, वेदान्त वाङ्मयाचे अंग आहे. समाजप्रबोधन हे कीर्तनाचे मुख्य कार्य. संतांनी त्याला भक्तीची जोड दिली. आजही कीर्तन परंपरा अव्याहत सुरू आहे. त्याचा समग्र आढावा डॉ. पी. जी. जोशी यांनी ‘कीर्तनरंग’मध्ये घेतला आहे. कीर्तन म्हणजे काय हे यातून समजून घेता येते.