महान होते स्वातंत्र्यवीर सावरकर...🙏 आपल्या लोकांना ते कळलेच नाहीत हीच शोकांतिका आहे.. 😔, खरंच तात्यांना जर समजून घेयच असेल तर त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या जीवनावर लिहिलेले गेलेले प्रत्येक साहित्य न साहित्य वाचलं पाहिजे... आणि त्यांचे साहित्य मी एक एक करून वाचत आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.
तात्यांच्या साहित्यांचे वाचन करत असताना एक वेगळा अनुभव मिळतो, असं वाटत आपण तात्यांच्या विचारांच्या खूप जवळ पोहचत आहोत.
डॉ. पद्माकर विष्णु वर्तक लिखित "स्वातंत्र्यवीर सावरकर मूर्तिमंत गीता" हे साहित्य प्रत्येकाने वाचलं पाहिजे हे माझे वयक्तिक ठाम मत आहे. कारण जेव्हा ह्या साहित्याचे मी शांतपणे वाचन केले तेव्हा तात्यांचे आचार - विचार हे आपल्यासाठी किती उपयोगी आहेत ते मला समजले म्हणून तात्या खरंच आपल्यासाठी एक मार्गदर्शक होते आणि कायम राहणार ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. तात्यांसारखं स्थितप्रज्ञ होण्याचा मी प्रयत्न करत आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे काय तर जो आनंदाचे हुरळून जात नाही आणि दुःखाने खचून जात नाही...!
तात्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏