Summary of the Book
खुशवंतसिंग यांची ही गाजलेली कादंबरी १९५६ मध्ये प्रकाशित झाली होती. मात्र आजही या कादंबरीची लोकप्रियता कमी झालेली नाही. स्वातंत्र्यानंतर देशाच्या झालेल्या फाळणीची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे.
राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत असतात त्याचे पडसाद भारत - पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या लहानशा गावांमध्ये कसे उमटतात, त्याचे चित्रण त्यातून केले आहे. तेथीलच एका गावात शीख आणि मुस्लिम बंधुभावाने राहात असतात. फाळणीशी त्यांचा संबधीही नसतो.
शिखांच्या मृतदेहांनी भरलेली ट्रेन अशा घटना - प्रसंगांनी व्यापलेल्या या कादंबरीचा थरार रोमांच उभे करतो. खुशवंतसिंग यांची खास शैली अनिल किणीकर यांच्या रसाळ अनुवादात उतरली आहे.