Summary of the Book
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारत पाटील यांनी जिल्ह्यात निर्मलग्राम योजना अत्यंत तळमळीने व जिद्दीने राबविली.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या या कामाची प्रशंसा तर केली आहेच; पण आपल्या प्रस्तावनेत त्यांनी भारत पाटील यांची तुलना अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्याशी केली आहे. पाटील यांनी अत्यंत परिश्रम करून जिल्ह्यातील छोट्या-छोट्या गावांत निर्मलग्राम योजना राबविली. त्यांना अनेक अडचणी आल्या; पण सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी ही योजना यशस्वी केली. या योजनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारे आणि एक मापदंड निर्माण करणाऱ्या पाटील यांनी या योजनेबाबतचे सारे अनुभव लिहिले आहेत. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.