Summary of the Book
मन म्हणजे काय, मन हेच आपले अस्तित्व मनाच्या आहारी न जाता मनालाच आपल्याकडे वळवून यशस्वी, ऐश्वर्यसंपन्न जीवन कसे मिळवायचे यासंबंधी संजय पंडित यांनी या पुस्तकात चर्चा केली आहे. या पुस्तकाचे एकूण नऊ विभाग आहेत. मनाचे विविध प्रकारे व्यवस्थापन कसे करायचे, याची माहिती ते देतात. मनाची एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढवायची, मनावर नियंत्रण कसे ठेवायचे याची माहिती ते देतात.
देव, धर्म, श्रद्धा, मन:शांती यांचे व्यवस्थापन कसे करायचे हे सांगताना त्यांनी अष्टांग योग, विपश्यना असिंचा आधार घेतला आहे. आहार,निद्र, भयाच्या व्यवस्थापनाबरोबरच अहंकार व विकारांचे व्यवस्थापन कसे करावे, याविषयीही ते सांगतात. अखेरीस मेंदूंची वर्तवणूक, अंतर्मन, ध्यानाचे फायाचे यांवर भाष्य केले आहे.