Hard Copy Price:
25% OFF R 270R 202
/ $
2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 270R
202
/ $
2.59
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
श्रीमद भगवतगीता श्रीकृष्ण बासरीचे सूर हा ग्रंथ म्हणजे भगवतगीतेवरील सुंदर भाष्य आहे. गालिचा जसा उलगडत जावा व त्याचे सुंदर नक्षीकाम दृष्टीस दिसावे तस सद्गुरू गुरुजी यांनी गीतेचा अर्थ समजावून सांगितला आहे. अलिप्तता साधणे म्हणजे नक्की काय? संसार करत राहूनही संन्यास उपभोगता येण म्हणजे नक्की काय? ब्रह्म संस्पर्ष कशास म्हणतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बापट गुरुजी यांनी लीलया दिली आहेत. प्रेमस्वरूपाने कृष्ण हा सर्व जगात व्यापलेला असूनही फक्त कर्तव्य कठोर भावनेने महाभारतात वावरतानाही त्याच्या हृदयात सर्वांसाठी अपार प्रेम भावनाच भरलेली होती आणि म्हणूनच सर्वांमध्ये असूनही सर्व कर्मे करूनही कृष्ण कशातच नव्हता. महाभारतात सर्व रुपात कृष्णच होता म्हणजे फक्त कृष्णच युद्धात मारल्या गेला तरी सुद्धा शिल्लक राहिला व सर्व सामान्य मृत्यू पत्करून तो आजही जिवंत आहेच. ही अलिप्तता आपणही मिळवू शकतो कशी तर हा ग्रंथ वाचून समजून घेऊन रोजच्या जीवनात ते ज्ञान वापरात आणून स्वउत्कर्ष साधू शकतो. बासरी सारखे विनम्र बनून सद्गुरुंच्या विचारांशी एकरूपता साधू. अहो मग विचार कसला करताय! चला पटकन हे पुस्तक घेऊन वाचन सुरू करूया। नमो गुरवे वासुदेवाय.
प्रिया दाभाडे
12 Jun 2018 05 30 AM
प्रतिथयश विवेचक परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी यांचं भगवद्गीतेवरील भाष्य असलेलं श्रीमद्भगवद्गीता : श्रीकृष्ण बासरीचे सूर, हा ग्रंथ म्हणजे साधकांसाठी एक पर्वणीच आहे. साधनोपयोगी दृष्टिकोन हे या ग्रंथाचे वेगळेपण आहे. जीवनाला आकार देणारं तत्त्वज्ञान अतिशय सोप्या आणि मार्मिक शब्दांत श्रीसद्गुरुंनी समजावले आहे. भर रणांगणात किंकर्तव्यमूढ अवस्था जशी अर्जुनाची झाली तशी अवस्था सर्वसामान्य व्यक्तीची जीवन जगत असताना होत असते. पण निष्काम कर्म करण्याचे उत्तम कौशल्य साधत, त्याला ज्ञान व भक्तीची जोड देत, अलिप्त राहून जीवन जगत असतानाच मोक्ष कसा साधावा याचे सर्वंकष ज्ञान या ग्रंथात दिलं आहे. ज्यांनी अजून गीतेमधील ज्ञान अवलोकन केलेलं नाही त्या सर्व साधक-वाचकांसाठी हा ग्रंथ एक दीपस्तंभ आहे. "ही भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर आहेत," अशा शब्दांत श्रीसद्गुरु भगवद्गीतेचं वर्णन करतात. मोक्षप्राप्तीचा राजमार्ग, भगवद्गीतेचे साधन सोपान, आत्मविचार, निष्काम कर्मयोग, स्थितप्रज्ञता, भक्तियोग व ब्रह्मसंस्पर्श ह्या महत्त्वाच्या विषयांवर श्रीसद्गुरु निरूपण करतात. टेम्बे स्वामी रचित वेदांतपरभागवतम व भावार्थही समाविष्ट केला आहे.