Summary of the Book
दारिद्र्याची/वेदनांची भीषण वर्तनं इथून पुढच्या काळातही येतील. तो सारा संताप समजून घेऊयाच. परंतु आता तेवढ्यावरच थांबता येणार नाही. आणि थांबता कामाही नये. सर्वहारा समाजाने जीवनसंघर्षात फोडलेले आर्त टाहो ऐकून एकीकडे हळहळायचे आणि दुसरीकडे ज्या व्यवस्थेने हे उध्वस्त-बेचिराख-भयाण जीवन त्यांच्या पदरात घातले, त्याच व्यवस्थेचे लाड-कौतुक आणि भरणपोषण करायचे, तीच धार्मिक-सांस्कृतिक व्यवस्था अबाधित कशी राहील याची बेमालूम काळजी घ्यायची, माजघरात त्याच संस्कृतीची निष्ठा राखायची, हा दुटप्पीपणा पुरे झाला. माणसाला अमानुष पातळीवर आणणाऱ्या संस्कृतीची उगमस्थानं आता खणून काढली पाहिजेत. आता मुळालाच हात घातला पाहिजे.