Summary of the Book
उमलत्य पिढीला राष्ट्रपित्याची फारशी ओळख नाही. सारं जग ज्यांच्याकडे आदराने बघतं त्या आपल्याच राष्ट्रपित्याची ओळख बालगोपालांना व्हायलाच हवी. कारण गांधीजींचे उद्याचे वारसदार तेच आहेत. या गोष्टींमधून गांधीजींच्या जीवनातील काही प्रसंग आणि त्या आधारे त्यांचे कार्य, गुण व असामान्यत्व यांचा संक्षिप्त आलेख मांडला आहे.
लेखिकेचा जन्म, बालपण आणि शिक्षण गांधीजींच्या आणि विनोबाजींच्या मार्गदर्शनाखाली चालणा-या वर्ध्याच्या महिलाश्रम या शिक्षण संस्थेत झाले. संस्थेच्या वातावरणातून आणि आई वडिलांकडून गांधीविचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले. वाचनातून गांधीविचार समजून घेण्याचा सतत प्रयत्न करणा-या वासंती सोर गांधीविचारावर व्याख्याने देतात व लेखन करतात. तसेच गांधीविचारावर व्याख्याने देतात व लेखन करतात. तसेच गांधीजींच्या जीवनप्रसंगांवर कथाकथनही करतात.