Summary of the Book
नेहमीचे जग कधी कधी कंटाळवाण वाटायला लागतं .
त्याच त्याच राहाटगाडग्यात आपण वर खाली होत असतो .
पण जर अचानक ,नाक्यावरच्या अंधाऱ्या कोपऱ्यावर कोणी दबा धरून बसलेलं दिसलं तर ?
कुठल्यातरी अघोरी दृष्टचक्रात आपण अडकलो तर ?
आदीम अशा संघर्षात तुम्ही कुठल्या बाजूला उभे राहणार ?
अशा अनेक मितींमध्ये आपल्याला लीलया भिरकावून देणारे नारायण धारप.
ज्यांनी आपल्या भयकथांनी गेली ४५ वर्ष मराठी मनावर मोहिनी घातली.
हाच अनुभव आपल्याला ' संसर्ग ' मधील भयकथा वाचताना येईल अशी खात्री वाटते. ...
भारत बुक हाऊस.