Summary of the Book
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून निर्माण झालेल्या समता , व्यक्तिस्वातंत्र्य , बंधुता , सामाजिक व आर्थिक न्याय , धर्मनिरपेक्षता , सहिष्णुता आणि संधीची समानता या मुल्यांवर आधारलेल्या राज्यघटनेचा भारताने स्विकार केला . विविध धर्म , भाषा , प्रदेश इ . बाबत जगात अन्य कोणत्याही देशाच्या वाट्याला न आलेली 'विविधता' ही भारताच्या , सुमारे पाच हजार वर्षाच्या 'सर्वसमावेशक' आणि 'व्यामिश्र' संस्कृती भारताच्या राष्ट्रवादाचा पाया आहे . भारत हे केवळ 'राजकीय' संघराज्य नाही ; तर ते 'सामाजिक' आणि सांस्कृतिक' संघराज्य आहे . दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या आशिया , आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांशी तुलना करता वरील वैशिष्ट्यांमुळेच भारताचे वेगळेपण उठून दिसते . आणि गेल्या ६०-७० वर्षात जगाच्या वर उल्लेखलेल्या व इतरही भागातील अनेक देशांचे विभाजन झाले आणि काही तर कोसळून पडले , तरीही भारताचे ऐक्य आणि एकात्मता टिकून राहिली , ती या वेगळेपणामुळेच . त्यामुळे , हे वेगळेपण जोपासणे आणि ते दृढ करणे , हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे .