Summary of the Book
जयश्री दानवे यांचे हे छोटे पुस्तक बोधप्रद कथांचा संग्रह आहे. आयुष्यातील दु:खाच्या प्रसंगावर विचार व विवेकानेच मत करता येते असे सांगून या पुस्तकातील कथा जीवन व व्यवहार यांची सांगड घालणाऱ्या आहेत, असे लेखिका सांगते.
आयुष्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहायला लावणाऱ्या या कथा जीवनाचे मोल समजावून सांगतात, त्याचबरोबर अंतर्मुख करायला लावतात. कोणता ना कोणता अनुभव आयुष्यात आपल्याला काही ना काही शिकवून जात असतो. यातील साठ कथा जीवनविषयक तत्त्वज्ञान छोट्या अनुभवातून सांगतात.