Summary of the Book
प्रवरानगर परिसराचा कायापालट करणारे आणि सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या आयुष्यावरील ही कादंबरी. डॉ. राजेंद्र वडमारे यांनी अहमदनगर परिसरातील विविध मंडळींशी बोलून अनेक संदर्भ तपासून ही कादंबरी लिहिली आहे.
आज सहकार चळवळीत वावरणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते नेते मंडळींपर्यंत प्रत्येकाने वाचावी अशी ही कादंबरी आहे. किती कष्ट आणि चिकाटीने त्यांनी ही कारखाना उभारला, ते या पुस्तकातून कळते आणि मनाला भिडते. कारखाना उभारणीचा तपशीलवार इतिहास यातून समोर येतो. विठ्ठलरावांचा करारीपणा आणि शेतकऱ्यांबद्दलची कळकळ हे सारे लख्खपणे जाणवते.