Summary of the Book
बकाल होत चालेली शहरे , अतिक्रमणाचे वाढते विळखे, वाढणारा भ्रष्टाचार, ढासळणारी व्यवस्था, सामान्य माणसाला आलेली किंवा त्याने पांघरलेली बधीरता हे विषय बहुतेक संवेदनशील माणसाच्या मनात हल्ली जागेच असतात. सामान्य माणूस या प्रश्नांच्या चिंतेने व्यग्र झालेला दिसतो. विखुरलेल्या सामान्य माणसाशी या प्रश्नांबद्दल संवाद करणारे , गंभीर विषयाच्या चर्चेतही आपले लालित्य आणि वाचनीयता कायम राखणारे हे समाजचिंतन आहे.