Summary of the Book
सुकन्या आगाशे यांचा हा तिसरा कथासंग्रह. 'इस्पितळ आणि पतंग उडवणारा माणूस' आणि 'न लिहिलेली पाने' या दोन कथासंग्रहांनंतरचा. आजच्या विज्ञानयुगातल्या, वर्तमानाला भिडणारा माणूस आज कसा आहे? तो कुठल्याही अलौकिक आधाराशिवाय उभा राहू पाहतो व त्यातले ताणतणाव साह्ण्याचा प्रयत्न करतो. तो भोव्तालातून माणसे शोधतो. करून जपतो. माणुसकी हा एकमेव आधार त्याच्या जगण्याला आहे.
त्यांच्या पहिल्या कथासंग्रहातील कथांमधील माणूस वर्तमान भवतालाकडे 'समूहातल्या एका' च्या दृष्टीने पाहत होता तर दुसऱ्या संग्रहात तो आदमी मिथ्यकथांमधील माणसांच्या आयुष्यांचे अन्वयार्थ शोधतानाही दिसला. त्याबरोबरच तो मानवी भावसंबंध कसे जुळतात व तुटतातही याच्या निरीक्षणात गढलेला दिसला. व्यक्तीचा भवतालाशी चालणारा संघर्ष व त्यातून त्याचे परत उभे राहणे या तिसऱ्या संग्रहातील कथांमधूनही दिसते. येथे अनेक कथा स्रीच्या जगण्यातून स्वत:ला ओळखण्या बद्दलच्या आहेत असे वाटू लागते तोच त्यांची कथा पुन्हा समूहाकडे वळली आहे. येथील कथा आशयदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहेत. आशयानुरूप बदलणारी कथनशैली येथे दिसते. दीर्घ वर्णनांत न लडबडनाऱ्या, अचूक, नेटक्या,मितभाषी शैलीत मांडलेल्या या कथा आपल्या वेगळ्या 'रूपाशयां'मुळे लक्षणीय ठरतात .