Summary of the Book
‘जानेवाले कभी नही आते, जानेवालोंकी याद आती है I’ व्यवस्थापनातही असं होतं. हवेहवेसे ग्राहक सोडून जातात, तेव्हा चक्क फ्रस्ट्रेशन येतं. ग्राहकांशी अबोला धरला जातो, तर ज्या ठिकाणी हे नवे ग्राहक जोडले जातात त्या ठिकाणाविषयी, संस्थेविषयी मत्सर वाटायला लागतो. पण प्रत्येक भली वाईट स्थिती व्यवस्थापनाला काही ना काही शिकवत जाते. यातून अधिकाधिक दुरुस्ती करणं याला ‘गुणवत्ता व्यवस्थापनात’ खूप चांगले मार्ग दिलेले आहेत आणि वाढत्या स्पर्धेमध्ये गुणवत्तावाढीसाठीच नव्हे; तर असलेली गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठीही प्रचंड मेहनत घ्यावी लागते.
आपला वेळ मौल्यवान आहे, हे एकदा का समजलं, की वेळेच्या व्यवस्थापनातील अर्धी बाजी आपण मारलेली असते. वास्तविक ‘गप्पा’ छेडणं हे आपल्या सगळ्यांचं आवडतं काम असत. आपण ज्या बंदी शाळेत काम करतो त्या तणावातून मुक्तता करण्यासाठी गप्पा हाच ‘रिलॅक्संट’ असतो. पण या रिलॅक्संटसाठी दुसरीकडे कामाच्या भाऊगर्दीचा प्रचंड ताण गप्पांच्या ओघात कधी वाढत जातो हे आपल्याला समजतच नाही.