Summary of the Book
डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं परिवर्तनाच्या वाटचालीतील स्थान अनन्य आहे. दबलेल्या, पिचलेल्या आणि हेच जिणं प्राक्तन समजणाऱ्या समाजाला जागं करण्याचं, आत्मसन्मानाचं भान देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. देशाची उभारणी कशी व्हावी आणि देश कोणत्या मूल्यानुरूप चालावा, यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अत्युच्च आहे. ज्या घटनेनं समतेवर आधारित न्यायाच्या राज्याची कल्पना उचलून धरली, जी आधुनिक भारताच्या कल्पनेचा गाभा बनली आहे; ती बनवण्यातील बाबासाहेबांचा सहभाग ही देशासाठी महान देणगी आहे. मुद्दा सामाजिक बदलांचा असो कि अर्थकारणाचा; बदलत्या काळातही त्यांचे विचार आणि कार्य पथदर्शक आहे, म्हणूनच त्याचा पुन्हा - पुन्हा धांडोळा घेण्याची आवश्यकता आहे. डॉ. आंबेडकरंविषयी विपुल लेखन होऊनही बदलत्या स्थितीत त्यांच्या विचारांचा जागर घडवत राहणं, ही समाजाची गरज आहे. नांदेडमध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात मान्यवरांच्या सहभागातून नेमकं हेच साध्य करण्याचा प्रयत्न झाला. या निमित्तानं समोर आलेलं विचारधन संदीप काळे यांनी पुस्तक रुपात आणलं आहे. त्याचं विवेकी समाज स्वागतच करेल !