Summary of the Book
रमेश पाटील यांच्या या संग्रहात 15 कथा आहेत. ग्रामीण भागातील वातावरण तसेच तळागाळातील लोकांचं जीवन या कथांचे विषय आहेत. बेकारीच्या झळांनी त्रासलेला अशोक "सावलीची बहीण' या कथेत भेटतो. काही कथांमध्ये गावातील राजकारण समोर येतं. जातीचा संघर्ष आणि जातीवरून दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती अशा बाबीही काही कथांमधून मांडल्या आहेत. मागासवर्गीय समाजातील तरुणांना किती संघर्ष करावा लागतो आणि त्यांची कशी फसवणूक होते तेही बांडगूळ या कथेतून जळजळीतपणे मांडलं आहे. उपेक्षितांच्या आणि नाही रे वर्गातील लोकांच्या या कथा अस्वस्थ करतात.