Summary of the Book
मुंबईच्या आश्रयाला आलेल्या एका कोकणवासीयाच्या ससेहोलपटीचे चित्रण ही कादंबरी करते. मुंबईत येऊन नावारूपाला आलेल्यांच्या अनेक कथा आहेत, त्या ऐकून -वाचून आणखी लोक मुंबईत येत असतात. परंतु आपल्या गावात जगणेही अशक्य झालेले अनेकजण केवळ चार घास मिळावेत आणि दोन पैसे गावी पाठविता यावेत यासाठीही येतात आणि जेमतेम आयुष्य जगतात. अशाच एका सुशिक्षिताच्या कोंडमाऱ्याची गोष्ट या कादंबरीत आहे.
सदाशिव वाशीकर हा कादंबरीचा निवेदक, मुंबई उपनगरातील एका माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून सुरुवातीपासून काम करताना शिक्षण क्षेत्रातील हरवत चाललेली मूल्यसंवेदना आधोरेखित करताना दिसतो.