Summary of the Book
प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे यांची आज पुण्यतिथी. आचार्य अत्रे लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते.
ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 'अभूतपूर्व' असेच या लढ्याचे वर्णन करता येईल.
आचार्य अत्रेंच्या लेखांचा संग्रह असलेले 'झालाच पाहिजे ' हे पुस्तक त्यांच्या प्रभावशाली लेखणीचा पुन:प्रत्यय देईल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील 'झालाच पाहिजे ' ही मंतरलेली घोषणा या पुस्तकाला दिलीये आहे.
'नवयुग 'या साप्ताहिकातील आणि कऱ्हेचे पाणी या अत्रेंच्या आत्मचरित्रातील काही मजकूर यासाठी निवडण्यात आला आहे. या पुस्तकात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची माहिती वाचकांना मिळते.
अत्रेंच्या वाणीने आणि लेखणीने त्याकाळी सरकारला धारेवर धरलं होतं. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र हे नाव राज्याला मिळाले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त कारणासाठीच या ग्रंथाची योजना केली गेली