Summary of the Book
विविध पुरस्कार मिळलेल्या राजेंद्र वाघ यांचा हा काव्यसंग्रह. 25 वर्षांच्या नोकरीच्या काळात वाघ यांनी अनेक अनुभव घेतले. त्यांपैकी काही अनुभवांना त्यांनी कवितेतून शब्दरूप दिले आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावरील कवितेतून त्यांनी त्यांचे समाजकार्य आणि त्यांची तळमळ हे नेमकेपणाने मांडले आहे.
44 कवितांमध्ये वाघ यांनी समाजातील विसंगती आणि गैरव्यवहार यावरही कोरडे ओढले आहेत. एखाद्या घटनेकडे कवी संवेदनशीलतेने कसा पाहतो आणि नेमकेपणाने त्यावर भाष्य करतो, ते काही कवितांमधून ठळकपणे जाणवते.