विजय महामुनी
06 Jul 2020 05 30 AM
संजय कळमकर यांना प्रामुख्याने विनोदी कथा,कादंबरी लेखक आणि कथाकथन करणारे वक्ते म्हणुन महाराष्ट्र ओळखतो, पण पत्रकारिता यासारख्या गंभीर व विविध पैलू असलेल्या विषयावर त्यांचे लेखन अंतर्मुख व्हायला भाग पाडते.
एखाद्या समूहाचा भाग म्हणून मनुष्य जेव्हा जगत असतो तेव्हा समूहापेक्षा वेगळं वागण्याला मर्यादा येतात, पण स्वतःचे पावित्र्य अबाधित ठेवून पत्रकारिता करणारा 'दिनू' लेखकाने विलक्षण ताकदीने उभा केला आहे.
कादंबरी384 पानांची असली तरी ती कुठं रटाळ होत नाही,उलट ती वाचायला घेतल्यावर सोडवत नाही.पत्रकारितेच्या विविध ज्ञात-अज्ञात बाजुंवर प्रकाश टाकणारी, प्रसंगी त्यातील उणी बाजू दाखवून,पत्रकारांची वेदना शब्दबद्ध करणारी माझ्या वाचनात आलेली पहिलीच कादंबरी !