Summary of the Book
बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा आणि प्रसंगावधान या गुणांचा समुच्चय मानला गेलेला व्यवस्थापक म्हणूनही कसा चांगला होता, हे या पुस्तकातून दिसून
येते. डॉ. प्रमोद पाठक यांनी बिरबलाच्या या गुणाचा पुस्तकातून मागोवा घेतला आहे. पाठक यांनी पुस्तकात अकबर बिरबलाच्या विविध कथांच्या माध्यमातून विषय उलगडला आहे. या कथा नव्या जगाशी जोडलेल्या आहेत.
त्यामुळे आधुनिक व्यवस्थापनाचे धडे त्यांतून मिळतात. उदा. अकबरावरील कामाचा बोजा वाढल्याने तो कुटुंबियांना वेळ देऊ शकत नाही, अशा स्थितीत काय करावे याचा सल्ला तो बिरबलाला विचारतो. किंवा अकबराच्या वेगवेगळ्या कारखान्यांचा आढावा, अथवा कारखाना बंद केल्याने रागावलेला अकबर... आदी गोष्टींमधून बिरबलाने त्याचे उत्तम व्यवस्थापन दाखवून दिले आहे.