Summary of the Book
अखिल जगतात अत्यंत मोठे व प्रभावी महाकाव्य असे जे महाभारत त्याची थोरवी समग्र व यथार्थ वर्णन करणे कोणालाही अद्यापि पूर्णांशाने साधलेले नाही. पंडितांनी अनेक शतकांपासून महाभारताचे त्या दृष्टीने अवलोकनही केलेले आहे व त्यातील कितीतरी कथां-पटकथांवरून आपली ग्रंथरचना केलेली आहे. ‘वासोच्छिटं जगत् सर्वं’ म्हणतात ते अगदी बरोबर आहे. या महाकाव्यातील थोर राजे, राण्या, मंत्री, ऋषीमुनी, आचार्य व इतर व्यक्ती, तसेच यात विवेचिलेले धर्म, नीति, व्यवहार, रूढी व इतर संस्था यांच्याशी आपल्या भारतवर्षाची तरी संस्कृती आणि प्रगती अगदी निगडित आहे. श्रौतकाळ आणि पुढील जैन-बौद्ध काळ यांच्यामधील काळाचा आदर्श असे हे महाकाव्य आहे.