Summary of the Book
भारतीय जनमानसात 'चाणक्य' ही व्यक्तिरेखा कायमचवलयांकित आणि कुतूहलपूर्ण अशी राहिली आहे. एकाचवेळीएक ऐतिहासिक चरित्रनायक आणि राष्ट्रवादी विचारसरणीचाप्रणेता, प्रख्यात राजनीतिज्ञ, मनस्वी चिंतक आणि ऋषीतुल्यपंडित अशी चाणक्याची प्रतिमा आहे. अनेक नाटकांतून,
दूरदर्शन मालिकांतून आणि कादंबऱ्यातून तिने आपली
मोहिनी भारतीय मनांवर टाकली आहे.
उध्वस्त धर्मशाळा सारखे नाटक लिहून राजकीय नाटककारांमधील मानबिंदू ठरणाऱ्या; गो. पु. देशपांडे यांना मात्र आगरकरांच्या 'एका' निष्कर्षामुळे 'चाणक्य' या व्यक्तीरेखेचा, तिच्या विचारांचा एक स्वतंत्र दृष्टिकोनातून मागोवा घेण्याची प्रेरणा झाली. मौर्यकालानंतर समाजातील चैतन्य हरपले - त्याचा विकास हरपला. हे मौर्यांचे श्रेयस आहे असें सांगून मार्क्सचा भारतीयांच्या इतिहासशून्यतेबाबतचा शेरा आगरकरांनी मार्क्सपूर्वीच मारला आहे. विष्णुगुप्ताची शासनव्यवस्थेची मीमांसा शुद्ध स्वान्तसुखाय नाही तर खरेच राष्ट्रप्रेमातून उद्भवली आहे असें मांडत मांडत गो. पु. देशपांडे यांनी आगरकरांच्या विधानाचा अन्वयार्थ प्रस्तुत नाटकात लावला आहे
या नाटकाने रंगकर्मींना आकर्षित केले आहे. शाम बेगेनेल यांच्या भारत एक खोज या मालिकेत या नाट्याचा समावेश झाला व दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यशाळेतर्फे सत्यदेव दुबेंच्या दिग्दर्शनाखाली या नाटकाचे हिंदीमधून प्रयोग झाले होते. श्रीराम लागूंच्या रूपवेधया संस्थेतर्फे झालेले मराठी रंगभूमीवरील या नाटकाचे प्रयोग विशेष लक्षवेधी ठरले.