Summary of the Book
पश्चिम बंगाल मधील मार्क्सवादी राजवटीच्या तीन दशकांच्या भक्कम तटबंदीवर धडका देत ममता बॅनर्जींनी कम्युनिस्टांचा हा गड अखेर उध्वस्त केला.कम्युनिस्टांच्या जुलूमशाहीत सर्वसामान्यांचे होणारे हाल त्यांना बघवत नव्हते.अन्याय-अत्याचाराविरुद्ध पेटून उठणं हा ममता बॅनर्जींचा मूळ स्वभाव.प्राणघातक हल्ल्यांची पर्वा न करता लोकांसाठी दिलेल्या लढ्यांमुळे त्या पाहता पाहता सर्वसामान्यांच्या 'दीदी' बनल्या.दीदी आज मुख्यमंत्री झाल्या असल्या तरी या सामान्य जनतेचा विसर त्यांना क्षणभरही पडत नाही.त्यांची राहणी पूर्वीइतकीच साधी आहे.कुठलाही बडेजाव त्यांच्यात नाही. जळजळीत आंदोलनांनी भरलेल्या त्यांच्या जीवनातही अनेक हळुवार क्षण आहेत.
मुळात दीदी चित्रकार आणि कवी आहेत. त्यामुळेच बालपण, वडलांचा प्रभाव, आईची माया, गरिबीतलं जीवन, सार्वजनिक जीवनातले सुरुवातीचे दिवस, मतलबी नेत्यांचं राजकारण,. राजीव गांधींचा दिलदारपणा, सोनियांबरोबरचे मतभेद आणि या सगळ्या घुसळणीतून निर्माण झालेली तृणमूल काँग्रेस...या साऱ्या गोष्टींचा आलेख त्यांनी आपल्या आत्मचरित्रात चितारला आहे.दीदींच्या संवेदनशील लेखणीत थेट काळजाला भिडण्याची ताकद आहे.