Summary of the Book
नर्मदानदीच्या उत्तर तीरावर नारेश्वर येथे वास्तव्य करणा-या श्री दत्तपादारविन्दमिलिन्द ब्रह्मचारी प. पू. रंग अवधूत महाराज यांनी हे स्तोत्र लिहिले. ते लिहिण्याचा उद्देश म्हणजे मन:शांती मिळावी, चित्त स्थिर व्हावे हा आहे. प.पू. रंग अवधूत कृपापात्र श्री. अमृतलाल नाथाभाई मोदी यांनी हे स्तोत्र पुस्तकरुपाने छापून प्रकाशित केले. ही गोष्ट आहे श्री दत्तजयंती संवत 1983 ची. विद्वान पंडितांनी, संतांनी याचा लाभ घेतला.
आता या मूळ संस्कृतमधील स्तोत्राचा (108 श्लोकांचा) भावार्थ दत्तसंप्रदायातील भक्तांसाठी सादर केला आहे, पुणे येथील श्री. मधुकर गोरे, प. पू. रंग अवधूत स्वामी यांचे एक अनुग्रहित भक्त यांनी. यात मूळ संस्कृत श्लोक, त्याचा मराठी भावार्थ व निरूपण असा भाग आहे. सर्व दत्तभक्तांना तो आवडेल अशी आशा आहे.