Summary of the Book
आजोबा आपल्या नातवंडांशी गप्पा मारत आहेत, अशी रचना करून या गोष्टी लिहिल्या आहेत, त्याचबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काळाचे भान ठेवलेले आहे. त्यामुळे मोबाईलचे वेड कसे धोकादायक आहे, हेदेखील एका गोष्टीतून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर "पाणी वाचवा' हा संदेश, फटाकेमुक्त दिवाळी का, ते गोष्टीतून पटवून देत मनोहरपंत आजोबा नातवंडांचे प्रबोधन करतात.