Summary of the Book
दलित साहित्यात १९८०पासून दलित स्त्रीचा आत्मस्वर आत्मकथनाच्या अंगाने सशक्तपणे पुढे आला. त्यात दलित पुरुष आत्मकथनांइतका निडरपणा नव्हता, पण विदोहाची एक वेगळीच संयत भाषा होती. भोगून झालेलं सारं पचवून, स्वत:च्या वेदनेची मिमांसा इथल्या उतरंड व्यवस्थेच्या अनुषंगाने करत या स्त्रिया लिहिल्या झाल्या. सात-आठ दलित स्त्रियांनी आपली जीवनगाथा उलगडली. या सा-या जणींच्या आत्मकथनांची एकत्रितपणे 'दलित स्त्री आत्मकथने' या पुस्तकात डॉ. श्यामल गरुड यांनी समीक्षा केलेली आहे. दलित स्त्रीचा एकूण विचार एकाच पुस्तकात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणूनही याचं महत्त्व अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना दलित स्त्री लेखिकेच्या प्रांगणात असं पाऊल पडणं हे येणा-या काळात दलित स्त्री समिक्षेच्या अंगाने जोरकसपणे विचार करू लागली आहे, त्याचं हे द्योतक आहे.