Summary of the Book
मुंबईत घडलेल्या गिरणी- कामगार संपाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी
एखाद्या चळवळीचे नेमके यश कोणत ? ते मोजायचे कसं गिरणीसंपानं उध्वस्त केलेल्या कुटुंबावर आजही हिरोशिमाची कळा आहे! टाळेबंदी केवळ गिरण्यांनाच नाही. हजारो स्वप्नांना लागली.
लहानग्यांची आयुष्ये बेचिराख झाली, घरादारावर अक्षरशः भांडवलदार वृत्तीचा नांगर फिरला. ह्या भेदक वास्तवाचं बेचैन करणारं दर्शन प्रस्तुत कादंबरीत घडत. वाचतावाचता जाणवतं -
ही कथा केवळ एका बबनचीचं नाही - एका खूप खोल अर्थानं ही आपली प्रत्येकाची कहाणी आहे !