Summary of the Book
ज्ञानेश्वरींतील अलौकिक काव्याचा विविध सौंदर्याचा आस्वाद घेण्याच्याच उद्देशाने या ग्रंथाची निर्मिती झाली आहे.अर्थातच ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचे विवेचन या ठिकाणी अभिप्रेत नाही. ज्ञानेश्वरी लिहितांना ज्ञानेश्वरांची भूमिका रसिक प्रतिभाशाली कवीचीच असून ती तार्किकाची अथवा तत्त्वज्ञाची भूमिका नव्हती हे सिद्ध करण्यासाठीच इतका विस्तार केला आहे. त्याच जातीचे कवी ज्ञानेश्वरही असल्यामुळे त्यांच्या काव्याचे विवेचन करीत असताना हळुवार वृत्तीच्या रसिकाचीच भूमिका पत्करणे जरूर आहे.