Summary of the Book
१९ व्या शतकाला 'प्रबोधनाचे युग' असे म्हटले जाते. या शतकातील महत्वाच्या व्यक्तिरेखांपैकी एक म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे होत. अखंड ज्ञानसाधना करणारे, निरपेक्षपणे समाजसेवा करण्याची वृत्ती धारण करणारे, आर्थिक प्रश्नांचा आणि आर्थिक सुधारणांचा मूलगामी विचार करणारे आणि राजकीय क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, असामान्य बुद्धिमत्तेने जगाला स्तिमित करणारे न्या. रानडे, यांनी या काळात भारतीय इतिहासाला अतिशय भरीव योगदान दिले आहे. गंगाधर गाडगीळांसारख्या श्रेष्ठ साहित्यीकालाही त्यांच्या व्यक्तिरेखेचा मोह पडला आणि त्यातूनच 'मन्वंतर' सारखी न्या. रानडे यांच्या चरित्रावर आधारित कादंबरी आकाराला आली. अतिशय परिश्रमपूर्वक गाडगीळांनी य कादंबरीची मांडणी केली आहे.
गंगाधर गाडगिळांची अखेरची चरित्रात्मक नवीन कादंबरी