Summary of the Book
तरुण कवी अभिजित कर्वे यांच्या 62 कवितांचा हा संग्रह. यामध्ये सात हिंदी कविताही आहेत. काही कवितांवर निसर्ग, नाती, कुटुंबातील सदस्य यांचा प्रभाव आहे. एका जवळच्या मित्राचे निधन कविता चटका लावून जाते. त्याच्या आठवणीने व्याकूळ झालेले मन कवितेमध्ये उतरते. पैसा, नशीब, एकदा तुम्ही, यासारख्या कविता जीवनातील संघर्षावर भाष्य करतात. बंध रेशमाचेसारखी छोटीशी कविता तरुणाईचे मन जिंकून घेते.