Prabhakar Kedarling Jadhav
26/11/2023
अतिशय छान लेखन केलेले असून शेती,माती,आणि शेतकरी यांची नाळ ऐकंमेकांशी बांधनारा हा कवी ख-या अर्थाने यशस्वी झालेला आहे.भुमिपूत्राच्या समस्या ह्या केवळ नैसर्गिकच आहेत अशातला प्रकार नसून त्या सामाजिक आणि राजकिय देखिल खूप मोठ्या भिषण स्वरुपातील आहेत...तरीही देखिल तो स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन जगाला पोसण्यासाठी सरसावलेला आहे.हे भिषण वास्तव त्यांनी शब्दरुप केलेले आहे.
विशेषतः या कवितासंग्रहाला लाभलेले सुरेख मुखपृष्ठ हे सरदारजी जाधव यांनी रेखाटून या संग्रहात " आत्माच " टाकल्याची अनूभुती येते..तर
अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष गुरुवर्य तथा सुप्रसिध्द ग्रामिण कथाकार श्रीयुत .भास्कर चंदनशीव सर यांच्या सुवर्ण अक्षररुपी प्रस्तावनेने या लेखनाला नि कवीला जे मोल प्राप्त झाले आहे ते परिमाणात व्यक्त करणे केवळ अशक्य त्यांच्या पेनीने या साहित्यावर प्रकाश टाकतांना केवळ अमृत वर्षावच केल्याची अनूभुती येते.
अखेरचं आणि मौलाचं म्हणजे गोदा प्रकाशनचे प्रकाशक दादा गोरे सर हे स्वतः साहित्यिक असून प्रकाशकही असल्यामुळे त्यांची दर्जेदार साहित्यनिर्मितीच्या पाऊलखूणा या कवितासंग्रहात दिसून येतात अशी ही कलाकृती वाचनीय असून सर्व रसिक बांधवांनी याचा अस्वाद घेणे ही एक पर्वणीचं ...
वरील सर्व थोरामोठ्यांचे करावे तेवढे कौतूक थोडेच....सर्व कार्य अभिनंदनिय ! धन्यवाद ....