Summary of the Book
जीवनात ध्येय निश्चित असेल तर आपले भविष्यच नाही तर वर्तमानही बदलतो. संपूर्ण विकास हे मानवी जीवनाचे लक्ष्य आहे. ते शक्य झाल्यास समाधान व आनंद मिळतो. शरीर विकास होणे हे यासाठी जसे आवश्यक आहे तसेच मानसिक, आर्थिक, सामाजिक व अध्यात्मिक विकास झाला, तरच संपूर्ण विकासाला महत्त्व आहे, हे सरश्री यांनी 'संपूर्ण लक्ष्य 'मधून सांगितले आहे.
संपूर्ण विकास साधण्यासाठी जीवनात एक उदिष्ट्य असावे लागते. त्याकडे मार्गक्रमण करण्यासाठी प्रथम अंगी शिस्त व नियंत्रण बाळगणे जरुरी आहे, ठोस योजना बनवून ती अंमलात आणली पाहिजे. कोणतीही तक्रार न करता आपली जबाबदारी लक्षात घेऊन सकारात्मक विचार, आचार, वागणूक ठेवावी लागते. विधायकतेचा सिद्धांत लक्षात घेतला पाहिजे.
'अशक्य ' शब्द मनातून काढून 'मी हे करीनच ' हा मंत्र सतत जपला पाहिजे. साहस, मनन, धीर, प्रामाणिकपणा, वचनबद्धता, आत्मविश्वास, ईश्वरावर श्रद्धा, निर्भयता हे छोटे दिसणारे गुणच आपल्याला उद्दिष्टापर्यंत पोचायला मदत करीत असतात. त्याप्रमाणे मानसिक, आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक विकास साधून अंतिम लक्ष्य कसे गाठायचे याविषयी सरश्री यांनी संपूर्ण मार्गदर्शन केले आहे.