Summary of the Book
छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे श्री रामदास स्वामी यांनी सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व ओळखून त्याचा प्रसारही केला होता. यासाठी वलभीम हनुमान याची ठिकठीकाणी प्रतिष्ठापना केली होती. तसेच प्रपंच. राजकारण, लेखन, वकृत्व, समाजकारण, अर्थकारण अशा सर्व विषयांवर त्यांनी दासबोधातून सखोल मार्गदर्शन केले आहे.
यातील ज्ञान सामन्यापर्यंत पोचविण्याच्या हेतून अरुण गोडबोले यांनी दासबोधातील एकूण सात हजार ८०० ओव्यांमधील सार ३६६ भागांत 'श्री दासबोध नित्यपाठ'मधून आणले आहे. दासबोधातील ओव्या वीस भागांत देऊन त्याचे निरुपण यात केले आहेत. स्तवन, मुर्खलक्षण, नवविधा भक्ती, मंत्र, देवशोधन, चौदा ब्रह्म, मायोद्धबनाम ज्ञानदशक, गुणरूप, जगज्जोतिनाम, भीमदशक, विवेक वैराग्य, मानरूप, अखंड ध्याननाम, आत्मदशक, सप्ततिन्वय, प्रकृतीपुरुष, बहुजिनसी, शिकवण, पूर्णदर्शक या शीर्षकांखाली रामदास स्वामी यांच्या ओव्या आणि त्याखाली त्याची निरुपण केले आहे.
त्यामुळे रामदास स्वामी यांचे विचार समजण्यास सोपे होतात. हे विचार त्या वेळीही उपयुक्त होते. तसेच ते आज व पुढील हजार वर्षेही उपयुक्त ठरणार आहेत, याची प्रचिती यातून येते