Summary of the Book
‘ …. तुम्हांला ग्रामीण जीवनाचा अस्सलअनुभव आहे आणि त्याला कथात्म रंगरूप देऊन तमाम तपशीलांसह वाचकांसमोर उभे करण्याची निवेदनशैलीही लाभली आहे. गतकाळाचं गौरवीकरण करत गळा काढण्यात तुमची कथा रमत नाही आणि ‘ आज आणि आत्ता “ ला साक्षात भिडते ही गोष्ट मला महत्वाची वाटते. ‘ग्रामीण कथा’ लिहिण्याच्या नावाखाली किस्सेबाज किंवा वखवखलेली कथानकंच मोठ्या प्रमाणात देण्याची परंपरा तुमच्या कथेनं स्पष्टपणे नाकारली आहे. कारण ज्या जीवनाविषयी तुम्ही लिहिता त्याबद्दलतुम्हांला जिवंत आस्था आहे....’
-भा. ल. भोळे
(आसाराम लोमटे यांना पाठविलेल्या पत्रातून)