Summary of the Book
'राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्राचे राष्ट्राने स्वीकारलेले राष्ट्रीय गीत,' अशी ज्याची संकल्पना असल्याचे सांगत प्रभाकर वैद्य यांनी वंदेमातरम जन-गण-मन मधून या दोन्ही गीतांचा जन्मापासूनचा इतिहास कथन केला आहे. प्रथम राष्ट्र ही संकल्पना विषद करताना आधुनिक राष्ट्रीयत्वाची वाटचाल आधुनिक भारतीय राष्ट्रीयत्वाविषयीचे विचार मांडले आहेत.
विविध देशांमधील राष्ट्रगीतांचे नमुनेही दिले आहे. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी १८७६ मध्ये रचलेल्या वंदेमातरम ची कहाणी सांगताना चार कडव्यांचे हे गीत व या गीतासंबंधी प्रमुख घटना दिल्या आहेत. बंग गीत ते सर्वमान्य राष्ट्रगीत तसेच राष्ट्रीय गीतापर्यंतचा वंदेमातरम चा प्रवास स्वतंत्र भारताने राष्ट्रगीत म्हणून रवींद्रनाथ टागोर यांचे जन-गण-मन स्वीकारले त्याचा इतिहास.
रवींद्रनाथ टागोर यांचे जन-गण-मन स्वीकारले त्याचा इतिहास, रवींद्रनाथ आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्राम व त्या वेळच्या घटनांचा उल्लेख केला आहे. महाकवी महंमद इक्ब यांचे हिंदोस्ता हमारा या गीतावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. भारताच्या इतिहासात मानाचे स्थान असलेल्या या राष्ट्रगीतांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती यातून मिळते.