Summary of the Book
आयुष्याच्या प्रवासात अनुभवांची शिदोरी हेच माणसाचं मोठं वैभव असतं. माणूस कोणत्याही जाती-जमातीचा, कोणत्याही पदावर काम करणारा असो; त्याचे अनुभव, आठवणी मनात रेंगाळत रहातात. काही खास व्यक्तिमत्त्व आयुष्यात भेटतील असं स्वप्नातही वाटणार नाही अशा काही खास व्यक्ती अचानक समोर येऊन उभ्या रहातात. त्या आपल्या जीवनाचा एक भाग होऊन जातात. न सांगता येणारे पण आयुष्याचे रंग उजळवून टाकणारे असे काही बंध. त्या क्षणांचा सुगंध मनात दरवळत राहतो आणि त्यातूनच फुलून येते आगळीवेगळी मैत्री...