Summary of the Book
कोकणातल्या आरवली या मूळ गावातला, शेतकरी कुटुंबातला मुलगा वडिलांच्या मुंबईतल्या चाळीतली घरात वाढतो. पुढे, चौथी इयत्तेपासून काका-काकीच्या छायेत आयुष्याला आकार मिळतो. 'डाका' नावाच्या कंपनीत कारकून म्हणून कामाला लागतो. या कंपनीत आपल्या गुंणांनी विश्वास संपादन करतो आणि विविध भट्ट्यांसाठी उष्णतारोधक म्हणून लागणारे क्वार्ट्झ आणि वाळूचे उष्णतारोधक मिश्रण (रॉमिंग मास) तयार करण्याच्या अनवट व्यवसायात येतो. राजस्थानातल्या अरावली पर्वतरांगेतील ब्यावर या अनामिक गावात रॉमिंग मासच्या उत्पादनांची जबाबदारी घेतो. तेथेच स्थिरावतो. या व्यवसायाला बरकत आणतो. आपल्या उत्पादनाच्या उत्तम गुणवत्तेतून देश-विदेशांत बाजारपेठ मिळवतो. हे करताना स्वतःच्या खाणी घेतो. अनुषंगिक दहा-बारा व्यवसाय निर्माण करतो. सोबतच्या सहकार्यांना मदतीचा हात देत स्वतंत्र व्यवसायाला प्रोत्साहन देतो. सामाजिक भान जपतो..... सारंच अविश्वसनीय आणि कौतुकास्पद...... मुळातून वाचावं आणि प्रेरणा घ्यावं असं हे आत्मकथन.