मराठी साहित्यातले कथाकार किरण गुरव यांची 'जुगाड' ही पहिलीच कादंबरी.
अभियांत्रिकी शिक्षणाचा डांगोरा पिटल्यानंतर नवे तंत्रज्ञान आत्मसात केलेली पिढी बेकारीच्या खाईत होरपळू लागल्या नंतरच्या वर्तमानाचा उभा आडवा छेद घेणारी कादंबरी म्हणजे 'जुगाड'.स्वप्नांचा पाठलाग करत नोकरी करत , अपमान आणि घुसमट सहन करत संपूर्ण तरूण पिढीचेच यंत्रात रूपांतर होते. यंत्राच्या खडखडाटात माणसाचा आतला आवाज कधी आणि कसा बंद होतो आहे हे लक्षातही येत नाही.अशा परिस्थितीत टिकून राहणे हाच खरा "जुगाड .
कादंबरी मध्ये Mechanical Engineering संबंधीत खूप शब्दांचा वापर केला आहे. त्या मुळे बाकी इतर क्षेत्रातील वाचकांना वाचत असताना कल्पना करताना थोडी अडचण येऊ शकते. तसेच 2-3 प्रसंग अनावश्यक वाटतात. त्यामुळे कथा मध्येच स्लो होऊन जाते. बाकी एक वेगळा विषय म्हणून ही कादंबरी वाचण्यास हरकत नाही.