Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
कथाकार आणि कादंबरीकार म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार्या रणजित देसाई यांनी नाटक हा वाङ्मयप्रकारही हाताळला. पण कथा आणि कादंबरीच्या प्रांतात त्यांना जसे यश मिळाले, त्या प्रकारचे यश त्यांना नाट्यलेखनाच्या क्षेत्रात मिळाले नाही. कथा, कविता, कादंबरीच्या मानाने देसाईंनी बर्याच उशिरा नाट्यलेखनाला सुरूवात केली. त्यांनी एकूण स्वत: एकूण चौदा नाटके लिहिली. एक नाटक प्रा. वसंत कानेटकर यांच्या सहकार्याने लिहिले. कथा, कविता, कादंबरी हे वाङ्मयप्रकार त्यांनी स्वयंस्फूर्तीने हाताळले. पण नाटक या वाङ्मयप्रकाराकडे मात्र ते बेळगाव येथील वरेरकर नाट्यसंघाच्या प्रेमळ आग्रहास्तव वळले. प्र.न. परांजपे यांनी,""कथाकादंबरीप्रमाणे नाटक हे माध्यमही तुम्हाला आव्हानात्मक वाटते म्हणून तुम्ही नाटके लिहिता का?’’ असा प्रश्न उपस्थित करताच रणजित देसाई उत्तर देताना म्हणतात, "" नाही. मी नाटके लिहिली ती मित्रांच्या आग्रहाने. त्यांच्या सोयीसाठी मी संहितेत अनेक बदलसुद्धा करून दिले आहेत.’’
नाटककार म्हणून जरी त्यांना फारसा लौकिक लाभला नसला तरी नाटक या वाङ्मयप्रकाराविषयी आणि रंगभूमीविषयी त्यांची एक विशिष्ट भूमिका होती. ते म्हणतात, ""नाट्यबांधणी ही अवघड गोष्ट आहे. केवळ तीन तासात एका कथानकातून नानाविध मनोभावना घेऊन प्रेक्षकांना रिझवणं, त्यांचं मनोरंजन करणं,ही सोपी गोष्ट नाही. नाटककाराने आपल्या नाटकावर स्वतंत्रपणे विचार करावा, अभ्यास करावा. मग ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावे.त्यांना भावनिक आधार द्यावा ही लेखक म्हणून नाटककाराची भूमिका हवी. तसेच त्यांनी परिवर्तनाला सामोरे जावे.’’
एक विशिष्ट भूमिका आणि दृष्टीकोन लक्षात घेऊन रणजित देसाईंनी ऐतिहासिक, सामाजिक व संगीत नाटके लिहिली. त्यांच्या नाट्यप्रवासातील हे एक नाटक.