Summary of the Book
संस्कृती, भक्तिमार्ग, शिक्षण, उद्योग, सहकार, समाजजागृती, चित्रपट, राजकारण, विचारप्रणाली इत्यादी क्षेत्रांत महाराष्ट्राने नेतृत्व केलेले आहे. या क्षेत्रांत ज्या व्यक्तींनी आपला ठसा उमटविला, राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत नेतृत्व करून महाराष्ट्राला आणि देशाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली;
अशा ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजीमहाराज, डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, स्वामी रामानंद तीर्थ, यशवंतराव चव्हाण, किर्लोस्कर बंधू, धनंजयराव गाडगीळ, र. धों. कर्वे, दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम, बालगंधर्व, आचार्य अत्रे, बा. सी. मर्ढेकर या प्रभृतींचा या `महाराष्ट्राच्या मानचिन्हां’मध्ये समावेश आहे.
या व्यक्तींच्या कार्य-कर्तृत्वाचा मान्यवरांनी काढलेला आलेख या पुस्तकरूपाने वाचकांपुढे ठेवला आहे. महाराष्ट्राची जडणघडण कोणी केली वाचे आजच्या तरुणवर्गाला आकलन व्हावे, त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे तरुणांना एकत्रित दर्शन घडावे, ही यापुस्तकनिर्मितीमागची प्रेरणा.
प्रस्तावनेमधून